Posts

Showing posts from January, 2023

सवय

Image
आज हा फोटो पाहिला आणि डोळे पाणावले. रोज खायला अन्न मिळेल की नाही याची शाश्वती नसताना सुद्धा फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला आपल्या घासातला घास काढून देणारे हे लेकरू मनाने अंबानी पेक्षाही श्रीमंत आहे.यावरून आजोबांनी लहानपणी सांगितलेली गोष्ट पुन्हा आठवली ती पुढील प्रमाणे जशीच्या तशी देतो.       डोक्यावर मध्यांनीचा सूर्य आग ओकत होता अठरा विश्व दारिद्र् झोपडीत ठाण मांडून बसलेले.घरातली स्त्री आज मुले शाळेतून घरी आली  तर त्यांना खायला द्यायला घरात अन्नाचा दाणा नाही आता लेकरांची भूक कशी भागवायची ? या चिंतेत असतानाच बाहेरून माई भिक्षा दे म्हणून आवाज देत एक संन्यासी दारात उभा राहिला.महाशिवरात्रीच्या घरी जणू एकादशी जेवायला आली आपल्या दुःखाने गांजलेल्या त्या माउलीने जरा त्रासिक चेहरा करूनच संन्याशाला जा बाबा पुढे माझ्या कडे काही नाही तुला द्यायला असे सांगितले.पण संन्याशी मात्र जणू हट्टाला पेटला अश्या स्वरात म्हणला माई जे काही असेल ते दे नाही म्हणू नकोस.आता मात्र त्या माऊलीचा संताप झाला रागाने ती म्हणाली अरे माझ्याच लेकरांना काही खायला नाही तुला काय देऊ चुलीतली राख ?संन्याशी विनम्र ...

#मैत्री

Image
  मैत्री कर्णा आणि दुर्योधनाची होती तशीच कृष्ण सुदाम्याची होती.एकदा सुदाम्याने कृष्णाला विचारले कृष्णा मी असा गरीब तू स्वता ऐशवर्यवंत तरी सुद्धा why are you in my list ? कृष्णच तो मंद स्मित करत सुदाम्याला म्हणाला शेवटी तू पण आलास तर फेसबुकवर ?भोळा सुदाम्या चकित होऊन म्हणाला अरे हो पण तुला कसे कळले ? किती भोळा आहेस मित्रा ? आणि या तुझ्या निर्व्याज भोळेपणाचाच मी चाहता आहे.अरे वेड्या मी चराचरात आहे माहीत आहे ना तुला ? मग फेसबुकच काय घेऊन बसलास अरे ते तर स्वताच नकळत का होईना कृष्णमय तर जन्मतः च आहे.        सुदाम्या तुला आठवतात आपले गुरुकुलातील दिवस ? एकत्र शिकलो, खेळलो पेंद्या,लंगड्या असे तुम्ही किती तरी सहकारी मला कुण्या राजपुत्रा पेक्षा जवळचे होतात ते तुमच्या गुणांमुळे.          मुळात मैत्री ही कोणत्याही कारणानी नाही तर गुणांनी होते.कोणत्याही कारणांनी होतो तो "व्यवहार" आणि गुणांच्या मुळे होते ती "मैत्री". तू मला भेटायला येताना जे पुरचुंडी भर पोहे आणले होतेस ना अश्या पोह्याची डिलिव्हरी ना कोण्या झोमोटोला जमणार ना कुण्या स्विगीला...

काक स्पर्श

Image
#काकस्पर्श खुप जोरात पाऊस झाला की मला लहानपणी वाचलेली चिऊताई आणि कावळ्याची गोष्ट आठवते.कावळा आपल्याकडे आश्रय मागेल म्हणून चिऊताईने अनेक कारण सांगत शेवट पर्यंत कावळ्या साठी दार उघडलेच नाही.तात्पर्य काय तर जेव्हा आपल्याकडेचे कोणाला काही द्यायच नसते तेव्हा त्यांच्या कडे देण्यासाठी फक्त कारण असतात.चिऊताईचे नेमके हेच झाले होते.कावळा कसाबसा का होईना पण संकटातून तरुन गेला.आता ऋतू बदलला पावसाळा जाऊन उन्हाळा आला.आता ऋतू बदलला आहेच तर कथा पण बदलुनच टाकू.           पावसाळा संपला घर वाहून गेलेला कावळा गावाच्या स्मशानभूमीतल्या एका कोपऱ्यात राहिला कित्येक दिवस.जसा पावसाळा संपला तसा कावळ्याने पुन्हा जुन्या झाडावर आपला मुक्काम हलवला.तेच मागच्या कथेतीलच शेणाचे घर परत नव्या उमेदीने त्याने बांधायला घेतले.हे सारे त्याची शेजारी तीच चिऊताई कावळ्याची लगबग बघत होतीच.पण मनात कुठे तरी आपल्या वागण्याची खंत मनात असल्याने ती कावळ्याच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हती.कावळ्याने अखेर परत तसेच शेणाचे घर बांधले आणि रहायला सुद्धा आला.रोजच्या रोज उन्हाळा वाढू लागला पण घर शेणाचे असल्याने कावळ्याला उन्ह...

एका आजोबांची गोष्ट

रिपोस्ट एका आजोबांची गोष्ट. माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट माहीत आहे ना? आता ती गोष्ट पुढच्या पिढीत आली टोपीवाल्याचा नातू विश्वमभर मोठा होऊन आजोबा सारखे टोप्या विकायला निघाला. निघताना आजोबा म्हणाला अरे जातो आहेस पण त्या जंगलातून जाऊ नकोस बर मागच्या वेळेस मी वाचलो माहीत आहे ना ? विश्वमभर म्हणाला हो मला सगळे माहीत आहे आणि असतेच. वाटेत विश्वमभर मनात म्हणाला अरे आपण तर हुशार मग माकडांना का घाबरायचे? आपण त्याच जंगलातून जाऊ म्हणून त्याने जंगलाचीच वाट पकडली.जंगलाच्या मध्यावर आल्यावर त्याला पण आजोबा सारखी झोप आली आणी तो पण एका झाडा खाली टोपयांची पेटी ठेऊन झोपला.तासाभरा नंतर विश्वमभर जागा झाला आणि पाहातो तर आजोबा सारखीच विश्वमभर ची गत झाली होती पेटीतील सगळ्या टोप्या माकडांनी पळवलेल्या. विश्वमभर मनात म्हणला चायला उगाच इकडून आलो तरी आजोबा सांगत होताच इतक्यात त्याला आजोबांनी टोप्या कश्या परत मिळवल्या ते आठवले.विश्वमभर उठून उभा राहिला पेटी उघडीच होती त्याने माकडांना दाखवून स्वताच्या डोक्यावरची टोपी रिकाम्या पेटीत टाकली आणि माकडे कधी टोप्या पेटीत टाकतात त्याची वाट पाहू लागला.तेव्हढत एक काळे धिप्पाड वान...

जय श्रीराम

संघ परिवाराची दोन यशस्वी आंदोलने एक कश्मिर बचाव 370 हटाव आणि दुसरे राम मंदिर आंदोलन.सुदैवाने आणि सद्सद्विवेक जागा असल्याने या दोन्ही आंदोलनात मना पासून सहभागी होतो.कश्मिर बचाव मधला तुरुंगवास भोगून आल्याचा अनुभव राम मंदिर आंदोलनात कामी आला.पोलीस खात्यात बरेच पोलीस हे सुद्धा राम मंदिराला पाठिंबा देणारेच होते.ज्या LIB वर जनतेची खडान खडा माहिती ठेवायची जबाबदारी असते तेच LIB वाले वेळेला आम्हाला माहिती पुरवत होते बचावाची वेळ आली तर काय करायचे काय नाही याचे पण उपाय सांगत होते.                सगळ्यात भीषण कारसेवा झाली ती 1990 ची रामभक्तांच्या रक्ताने मुलायम ने शरयू नदी लाल केली हे वृत्त जसे बाहेर पडले तसा जनतेत क्रोध आणि आक्रोश वाढत गेला.आमची  गँग कारसेवेला गेली होती मी मात्र कॉलेज च्या परिक्षेमुळे जाऊ शकल नव्हतो. संध्याकाळी आम्ही मुल्लायम आणि V P सिंगच्या फोटोला चपलांचे हार घालून चौका चौकात लावले. तासाभराने पोलिसांनी येऊन ते ताब्यात घेतले त्यानंतर  दोन LIB पोलीस मित्र माझ्या घरी आले असे काही उद्योग करून अडचणीत येऊ नका म्हणून.इतक्यावरच न थांबता ...

हम तुम (हिंदी कविता )

बहोत कुछ है दिल के अंदर बताना चाहता हु मै मुझे मालूम है ये ना 'तेरी मगर मेरी ही जरूरत है     न शिकवा है तुझसे कोई ना तुझसे कोई शिकायत है बुला कर भी ना आना तेरी तो पुरानी आदत है 'तेरी आदतो से हु वाकीफ अब तुझे पहचनता हु मै अगर ठान ली जो तुमने लौट आना तो बहोत दूर पलट कर ना तुम देखोगे . माना की तेर इश्क मे मश्गुल आज भी है हम मगर हकीकत से मूह मोडना मेरी फ़ितरत मे नही है तुझे मुबारक 'तेरी दुनिया मे सदा आबाद रहोगे तुम मेरी बरबादी को कभी भी गलती से याद मत करना. कोई उनको जा के ये मेरा पैगाम यादसे दे देना कही दिख जाये शरह मे तो नजर अंदाज कर देना. एक बार आखे मिलाने की सजा भूगत रहे है हम ताउमर जिंदगी इसीसे सजानी है 'तेरी इश्क की मेरे पास यही तो आखरी निशानी है. निनाद.

देणाऱ्याचे हात

मित्रा बरोबर काल जेवायला गेलो होतो जेवून बाहेर पडलो तसा मागून कुणी तरी हाक मारली निनाद सर...तसे मी आणि मित्र थांबून मागे बघितले तर एक चाळिशीतला माणूस मला थांबायची खूण करत धावत माझ्या दिशेने येत होता.पॉश कपडे भारीतला गॉगल आधी मी ओळखलेच नाही पण जसा जवळ आला तसे लक्षात आले अरे हा तर विजू.          काय सर किती वर्षांनी भेटताय विजू रस्त्यातच वाकून नमस्कार करत म्हणला.मी जरा त्याच्या रस्त्यातल्या नमस्काराने असहज झालो म्हणले अरे नमस्कार काय करतो लहान आहे का तू आता ? तर हसून मला म्हणला सर तुमचे उपकार आहेत माझ्यावर.तुम्ही मला नोकरी लावली होतीत न त्या कंपनीच्या पुण्यातल्या ब्रँच चा मॅनेजर झालोय ही तुमचीच कृपा.म्हणलं अरे वेडा आहेस का रे ? नोकरी साठी मी फक्त शब्द टाकला होता नोकरी तुला मिळाली ती तुझ्या पात्रतेमुळे.आता मॅनेजर झालास ते तुझ्या कष्टाळू पणा आणि प्रामाणिकपणा मुळे यात माझे कसले आले श्रेय ? असे नाही सर विजू जरा कळवळूनच म्हणला.अहो जेव्हा मला खरच गरज होती तेव्हा तुम्ही धावून आलात माझ्या साठी देवा सारखे.वाईट दिवसातून बाहेर आलो ते तुमच्या त्या एका शब्दा मु...

डोळस प्रेम

Image
मला स्वताला आवडलेली प्रेमकथा म्हणजे चार्ली चॅप्लिनचा "सिटी लाईट" एक ही संवाद नसताना सुद्धा हा मूक चित्रपट काळजाचा ठाव घेऊन जातो.स्टोरी साध्या सरळ आणि लोकांच्या दुःखात त्यांना मदत करणाऱ्या भंगण चार्लीची.                    योगायोगानेच फुटपाथवर भेटलेली आंधळी  फुलराणी जी नसलेल्या डोळ्यांनी आपल्या फुलांच्या साठी ग्राहक शोधत असे.आधी सहानुभूती मग काळजी असा प्रवास करत चार्ली त्या अंध फुलराणीच्या प्रेमात पडतो.मधल्या काळात चार्लीला दारू पिऊन टून झालेला एक विक्षिप्त जीव द्यायला आलेला दिसतो.त्याला आत्महत्या करण्या पासून रोखण्यात चार्लीला यश येते.तसा तो विक्षिप्त बेवडा याला आपल्या घरी घेऊन जातो.सकाळी दारू उतरल्यावर मात्र याला घरातून हाकलून देतो.चार्ली स्वताला त्या अंध फुलराणीत गुंतवून टाकतो. एकदा बेवड्या मित्रा कडून 10 डॉलर घेऊन तिची सगळी फुले एकाचे वेळी विकत घेतो,तिला मित्राच्या गाडीतून घरी सोडून येतो.काही दिवसांनी ती आजारी आहे कळल्यावर हा तिला भेटायला घरी जातो.तिथे टेबल वर त्याला घरमालकाची उद्या "22"डॉलर भाडे भरले नाही तर घर खाली करायची नोटीस...

#मूल्यमापन

Image
  गावात भिक्षा मागून गोपाळ आपल्या गुरुकुलात परत आला पण आज चेहरा जरा त्रासलेलाच होता.गुरुजींच्या लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही,गोपाळ तसा गुणी मुलगा सधन कुटुंबातला पण गुरुकुलातल्या नियमा नुसार भिक्षा मागायला जाणे गुरुकुलातल्या परंपरेचा भाग म्हणून त्यालाही जावे लागत असे.                      हात पाय धुवून गोपाळ आला तसा गुरुजींनी त्याला आवाज दिला गोपाळ इकडे ये जरा.तसा गोपाळ गुरुजींच्या समोर येऊन उभा राहिला.काय रे असा चेहरा त्रासिक का झालाय तुझा ? इतका वेळ मनात साठवलेले दुःख अपमान सारे काही आठवून गोपाळ क्षणभरात म्हणाला गुरुजी उद्या पासून त्या वाड्यातल्या घरी मी भिक्षा मागायला जाणार नाही आज त्या वाड्याची मालकीण मला भिकारी म्हणाली.गुरुजी फक्त हसले त्यांनाही पटले होते गोपाळचे दुखावले जाणे पण त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाले अरे वेड्या ती तुला भिकारी म्हणाली म्हणून तू लगेच थोडी भिकारी होणार आहेस ? तिने तुला तिच्या वकुबा प्रमाणे वागवले तिला भिक्षा आणि याचना यातला फरक कळला नाही हा तिचा दोष आहे.आणि तिच्या दोषा साठी तू तुझे अवमूल्यन क...

ऋणानुबंध

Image
 #ऋणानुबंध सध्या म्हणजे जानेवारी पासून जरा लवकरच झोपतोय पण असे संकल्प वैगेरे म्हणून नाही सहजच.तसेच 11.30 ला नेट बंद करून झोपणार तेव्हढ्यात जुलियाच्या मुलाचा मेसेज आला hi yaar."जुलिया" माझी रोमानियन मैत्रीण,गेली 20 वर्ष मैत्री होती ती खंडित झाली ते फक्त तिच्या अचानक निधनाने.तिलाही जाऊन आता 3 वर्ष होतील.हा इस्तवान तेव्हा जेमतेम 6 वर्षांचा होता दिसायला आई इतकाच सुंदर.जुलियाला इच्छा होती की भारतीय मुलगी दत्तक घ्यायची पण ते नव्हते योग तिचे.मी तिला म्हणायचो पण यार मला मुलगी असती तर तुझ्या लेकाला नक्कीच जावई करून घेतला असता माझा.आज दोन वर्षा नंतर इस्तवान ला का आठवण आली कुणास ठाऊक म्हणे पर्यत त्याचा दुसरा मेसेज आला आज 2 वर्षांनी रोमानियात आलोय जर्मनीत जॉब करतोय.मगाशी आईच्या ग्रेव ला भेट देऊन आलो तिथे तुझ्या नावाने पण फुले वाहून आलो.क्षणभर कळेच ना मला नक्की काय व्यक्त व्हावे ? मैत्रीण गेल्याचे दुःख तर होते आहेच पण तिच्या लेकाने इतक्या आठवणीने माझ्या वतीने त्याच्या आईला फुले वाहिली याचे समाधान वाटले.गेल्या नंतरही जुलियाचे माझे ऋणाबंध तुटले नाहीत.मला इस्तवानचे खूप कवतुक वाटले जुलिया गेल...