आमची येरवडा यात्रा(2)
मगाच पर्यंत थ्रिलचा आनंद लुटून झाला आता येरवडा कारागृहातील प्रशासनीक अधिकाऱ्याने सगळ्या नोंदी आणि तपासण्या पूर्ण करून आम्हाला अधिकृत राजकीय कैद्यांचा दर्जा दिला.आत नोंदी करताना पोलीस आईचे नाव काय विचारत(ते का ? याचा उलगडा सुद्धा त्या गडबडीत विचारुन घेतला)मग वडिलांचे,तसे त्या पोलिसाने त्याच्या खाक्यात बापाचे नाव असा प्रश्न केल्या बरोबर पोरे भडकली ओ नीट बोला बापाचं काय म्हणता ?वडील म्हणा नीट. देशभक्ती बरोबर पितृभक्ती जागृत पाहून त्या पोलिसांचे वरिष्ठ त्या पोलिसाला म्हणले अरे ते सगळे चांगल्या घरचे आहेत त्यांना नीट वागणूक द्या तसे पोलीस बापा ऐवजी वडिलांचे नाव काय तुझ्या ? असे साजूक स्वरात विचारू लागले. हे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर आमची रवानगी त्यांनी बराकीत केली. तुरुंगात रवानगी म्हणजे संकटच पण आमची कथाच वेगळी हे सगळे कट्टर हिंदुत्ववादी ठेवले कोणत्या बराकीत ? तर महात्मा गांधी बराकीत.बिचारे गांधीजी...हे राम बराकीत सोडायला आलेल्या पोलिसाने आम्हाला बराकीत नेले तेव्हा तिथे किमान ऐंशी नव्वद कच्चे कैदी रहात होते.कोणी पाकिटमार,कुणी भूरटा चोर नाना तऱ्हेचे गुन्हेगार पण सगळे लहान वयातील ...