Posts

अव्यक्त गुलाब

 # अव्यक्त गुलाब # संध्याकाळी वाटले होते तू येऊन जाशील पण तू आलाच नाहीस.कधी नव्हे ते मनाचा हिय्या करून तुला सांगणार होते. गुलाबाची कळी म्हणून खुलले ते वसंत आला म्हणून, आणि त्याच्या प्रेमात पडले बिनशर्त.वसंता नंतर माझी पहिली ओळख झाली ती तुझ्या मंद झुळकीशी.         वसंत नव्हतास रे तू माझा पण सखा,मित्र तर नक्कीच होतास.वसंता पेक्षाही तुला माझ्या सुवासाचे कवतुक त्याला हाताला धरून बागभर बागडून माझ कवतुक करायचास ज्यांना आवडला त्यांना कवतुक करायला मोहात पाडलस.उन्हाने काहिली झाली आणि तू फुंकर घातली नाहीस असे कधीच झाले नाही.तुझी रूप तरी किती ...? कधी  मंद झुळुक, कधी थंड बोचरा व्हायचास कधी चिडलास की सैरभैर होऊन सोसाट्याने वाहायचास.          वसंत नव्हतास रे तू माझा पण वसंतालाही हेवा वाटेल असा सहवास होता आपला.तुझ्या सवे झुलताना तुझ्या सवे खुलताना चे क्षण आठवले तरी आताही अंगावर काटा येतो.तु सुद्धा अगदी शहाणा होतास पण थोडा वेडाही तुला फक्त इतकेच माहिती होते की तू माझा वसंत नाहीस पण ....इतरांच्या पेक्षा वेगळा होतास जवळचा ज्याच्या असण्याने मी खुलायच...

तुम .....

कैसे भुलेंगे तुम्हे दोस्त ? अब जिंदगी का हिस्सा  तो बन गये हो. जिंदगी भर एक कहा  अन कहा  किस्सा तो  बन ही गये हो.

सवय

Image
आज हा फोटो पाहिला आणि डोळे पाणावले. रोज खायला अन्न मिळेल की नाही याची शाश्वती नसताना सुद्धा फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला आपल्या घासातला घास काढून देणारे हे लेकरू मनाने अंबानी पेक्षाही श्रीमंत आहे.यावरून आजोबांनी लहानपणी सांगितलेली गोष्ट पुन्हा आठवली ती पुढील प्रमाणे जशीच्या तशी देतो.       डोक्यावर मध्यांनीचा सूर्य आग ओकत होता अठरा विश्व दारिद्र् झोपडीत ठाण मांडून बसलेले.घरातली स्त्री आज मुले शाळेतून घरी आली  तर त्यांना खायला द्यायला घरात अन्नाचा दाणा नाही आता लेकरांची भूक कशी भागवायची ? या चिंतेत असतानाच बाहेरून माई भिक्षा दे म्हणून आवाज देत एक संन्यासी दारात उभा राहिला.महाशिवरात्रीच्या घरी जणू एकादशी जेवायला आली आपल्या दुःखाने गांजलेल्या त्या माउलीने जरा त्रासिक चेहरा करूनच संन्याशाला जा बाबा पुढे माझ्या कडे काही नाही तुला द्यायला असे सांगितले.पण संन्याशी मात्र जणू हट्टाला पेटला अश्या स्वरात म्हणला माई जे काही असेल ते दे नाही म्हणू नकोस.आता मात्र त्या माऊलीचा संताप झाला रागाने ती म्हणाली अरे माझ्याच लेकरांना काही खायला नाही तुला काय देऊ चुलीतली राख ?संन्याशी विनम्र ...

#मैत्री

Image
  मैत्री कर्णा आणि दुर्योधनाची होती तशीच कृष्ण सुदाम्याची होती.एकदा सुदाम्याने कृष्णाला विचारले कृष्णा मी असा गरीब तू स्वता ऐशवर्यवंत तरी सुद्धा why are you in my list ? कृष्णच तो मंद स्मित करत सुदाम्याला म्हणाला शेवटी तू पण आलास तर फेसबुकवर ?भोळा सुदाम्या चकित होऊन म्हणाला अरे हो पण तुला कसे कळले ? किती भोळा आहेस मित्रा ? आणि या तुझ्या निर्व्याज भोळेपणाचाच मी चाहता आहे.अरे वेड्या मी चराचरात आहे माहीत आहे ना तुला ? मग फेसबुकच काय घेऊन बसलास अरे ते तर स्वताच नकळत का होईना कृष्णमय तर जन्मतः च आहे.        सुदाम्या तुला आठवतात आपले गुरुकुलातील दिवस ? एकत्र शिकलो, खेळलो पेंद्या,लंगड्या असे तुम्ही किती तरी सहकारी मला कुण्या राजपुत्रा पेक्षा जवळचे होतात ते तुमच्या गुणांमुळे.          मुळात मैत्री ही कोणत्याही कारणानी नाही तर गुणांनी होते.कोणत्याही कारणांनी होतो तो "व्यवहार" आणि गुणांच्या मुळे होते ती "मैत्री". तू मला भेटायला येताना जे पुरचुंडी भर पोहे आणले होतेस ना अश्या पोह्याची डिलिव्हरी ना कोण्या झोमोटोला जमणार ना कुण्या स्विगीला...

काक स्पर्श

Image
#काकस्पर्श खुप जोरात पाऊस झाला की मला लहानपणी वाचलेली चिऊताई आणि कावळ्याची गोष्ट आठवते.कावळा आपल्याकडे आश्रय मागेल म्हणून चिऊताईने अनेक कारण सांगत शेवट पर्यंत कावळ्या साठी दार उघडलेच नाही.तात्पर्य काय तर जेव्हा आपल्याकडेचे कोणाला काही द्यायच नसते तेव्हा त्यांच्या कडे देण्यासाठी फक्त कारण असतात.चिऊताईचे नेमके हेच झाले होते.कावळा कसाबसा का होईना पण संकटातून तरुन गेला.आता ऋतू बदलला पावसाळा जाऊन उन्हाळा आला.आता ऋतू बदलला आहेच तर कथा पण बदलुनच टाकू.           पावसाळा संपला घर वाहून गेलेला कावळा गावाच्या स्मशानभूमीतल्या एका कोपऱ्यात राहिला कित्येक दिवस.जसा पावसाळा संपला तसा कावळ्याने पुन्हा जुन्या झाडावर आपला मुक्काम हलवला.तेच मागच्या कथेतीलच शेणाचे घर परत नव्या उमेदीने त्याने बांधायला घेतले.हे सारे त्याची शेजारी तीच चिऊताई कावळ्याची लगबग बघत होतीच.पण मनात कुठे तरी आपल्या वागण्याची खंत मनात असल्याने ती कावळ्याच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हती.कावळ्याने अखेर परत तसेच शेणाचे घर बांधले आणि रहायला सुद्धा आला.रोजच्या रोज उन्हाळा वाढू लागला पण घर शेणाचे असल्याने कावळ्याला उन्ह...

एका आजोबांची गोष्ट

रिपोस्ट एका आजोबांची गोष्ट. माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट माहीत आहे ना? आता ती गोष्ट पुढच्या पिढीत आली टोपीवाल्याचा नातू विश्वमभर मोठा होऊन आजोबा सारखे टोप्या विकायला निघाला. निघताना आजोबा म्हणाला अरे जातो आहेस पण त्या जंगलातून जाऊ नकोस बर मागच्या वेळेस मी वाचलो माहीत आहे ना ? विश्वमभर म्हणाला हो मला सगळे माहीत आहे आणि असतेच. वाटेत विश्वमभर मनात म्हणाला अरे आपण तर हुशार मग माकडांना का घाबरायचे? आपण त्याच जंगलातून जाऊ म्हणून त्याने जंगलाचीच वाट पकडली.जंगलाच्या मध्यावर आल्यावर त्याला पण आजोबा सारखी झोप आली आणी तो पण एका झाडा खाली टोपयांची पेटी ठेऊन झोपला.तासाभरा नंतर विश्वमभर जागा झाला आणि पाहातो तर आजोबा सारखीच विश्वमभर ची गत झाली होती पेटीतील सगळ्या टोप्या माकडांनी पळवलेल्या. विश्वमभर मनात म्हणला चायला उगाच इकडून आलो तरी आजोबा सांगत होताच इतक्यात त्याला आजोबांनी टोप्या कश्या परत मिळवल्या ते आठवले.विश्वमभर उठून उभा राहिला पेटी उघडीच होती त्याने माकडांना दाखवून स्वताच्या डोक्यावरची टोपी रिकाम्या पेटीत टाकली आणि माकडे कधी टोप्या पेटीत टाकतात त्याची वाट पाहू लागला.तेव्हढत एक काळे धिप्पाड वान...

जय श्रीराम

संघ परिवाराची दोन यशस्वी आंदोलने एक कश्मिर बचाव 370 हटाव आणि दुसरे राम मंदिर आंदोलन.सुदैवाने आणि सद्सद्विवेक जागा असल्याने या दोन्ही आंदोलनात मना पासून सहभागी होतो.कश्मिर बचाव मधला तुरुंगवास भोगून आल्याचा अनुभव राम मंदिर आंदोलनात कामी आला.पोलीस खात्यात बरेच पोलीस हे सुद्धा राम मंदिराला पाठिंबा देणारेच होते.ज्या LIB वर जनतेची खडान खडा माहिती ठेवायची जबाबदारी असते तेच LIB वाले वेळेला आम्हाला माहिती पुरवत होते बचावाची वेळ आली तर काय करायचे काय नाही याचे पण उपाय सांगत होते.                सगळ्यात भीषण कारसेवा झाली ती 1990 ची रामभक्तांच्या रक्ताने मुलायम ने शरयू नदी लाल केली हे वृत्त जसे बाहेर पडले तसा जनतेत क्रोध आणि आक्रोश वाढत गेला.आमची  गँग कारसेवेला गेली होती मी मात्र कॉलेज च्या परिक्षेमुळे जाऊ शकल नव्हतो. संध्याकाळी आम्ही मुल्लायम आणि V P सिंगच्या फोटोला चपलांचे हार घालून चौका चौकात लावले. तासाभराने पोलिसांनी येऊन ते ताब्यात घेतले त्यानंतर  दोन LIB पोलीस मित्र माझ्या घरी आले असे काही उद्योग करून अडचणीत येऊ नका म्हणून.इतक्यावरच न थांबता ...